बदलापूरः बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकण्याचा प्रकार पश्चिमेतील सत्संग विहार या संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिकांनी लक्ष वेधल्यानंतर अंबरनाथ महसूल प्रशासनाने संस्थेला १० कोटी १६ लाख रूपयांच्या दंडाचे तसेच नदीतील मातीचा भराव काढून नदी पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. मात्र संस्थेने या आदेशाची पूर्तता न केल्याने अखेर अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर पर्यावरणप्रेमींना समाधान व्यक्त केले असले तरी संस्थेवर कठोर कारवाई करून असे प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाते आहे.












