कल्याण – बुधवार सकाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, आसनगाव भागातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. लोकल अनियमित वेळेत धावत असल्याने रेल्व स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी आणि मिळेल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांच्या उड्या पडत आहेत.












