रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात सलग पाच दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे आता गुहागर व राजापुर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. खेडमधील जगबुडी नदी व राजापुर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.












