3.3 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

दरम्यान, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, मोसमी वाऱ्यांची तीव्रता काही प्रमाणात वाढल्याने पाऊस पडत आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी आहे. बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र वगळता अन्य प्रणाली सक्रिय नाही.

वसई: मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरात पावसाचा जोर चांगलाच राहिला आहे. या पावसामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. यात धामणी धरण ७५ टक्के तर पेल्हार धरण ८५ टक्के भरले आहे.

वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाअंतर्गत धामणी धरणातून दररोज २०० दशलक्षलीटर पेल्हार मधून १० दशलक्षलीटर आणि उसगाव धरणातून २० दशलक्षलीटर तर एमएमआरडीएच्या सुर्या योजनेतून १८० दशलक्षलीटर असा एकूण ४०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा शहरात होतो.मागील काही दिवसांपासून पावसाने पालघर जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने नद्या, धरणे, तलाव या तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः ज्या धरण तलावातून नागरिकांना वर्षभर पाणी पुरवठा केला जातो त्यातील जलसाठा वाढला आहे.

धामणी धरणाची क्षमता ही २७६. ३५ दशलक्ष घनमीटर एवढी असून त्यापैकी २११.८६७ इतका पाणीसाठा म्हणजेच ७५.७६ टक्के इतका म्हणजेच वर्षभर पुरेल इतका जलसाठा जमा झाला आहे तर पेल्हार धरणाची क्षमता ३.५६ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी ३.०३० इतका पाणीसाठा जमा झाला असून हा साठा २०० दिवस पुरेल इतका आहे. तर उसगाव धरण मात्र अद्यापही ५० टक्के इतकेच भरले असून त्यात केवळ ७० दिवस पुरेल इतका जलसाठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.  अजूनही दोन ते तीन महिने पावसाचे आहेत. या कालावधीत चांगला पाऊस झाला तर शहराची पाणी चिंता मिटेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

पाझरतलाव ही तुडूंब 

नायगाव पूर्वेच्या भागात चंद्रपाडा वाकीपाडा परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाझर तलाव तयार करण्यात आले आहे.उन्हाळ्यात हे तलाव पूर्णतः आटून गेले होते. मात्र मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या तलाव तुडूंब भरून गेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in