राजकीय पुढाऱ्यांकडे कर्ज येणे बाकी नाही. काही चुकीचे निर्णय, अनावश्यक कर्जवाटप आणि वसुली न झाल्यामुळे बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे बँक राजकीय नेत्यांनी बुडविली, असे म्हणता येणार नसल्याचा दावा कोकाटे यांनी केला. बँक सुरळीत राखण्यासाठी प्रशासक असावा, ही आपलीही धारणा असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले.