ठाणे : घोडबंदर मार्गावरील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कासारवडवली येथील उड्डाणपूलाची मार्गिका खुली झाल्याने कासारवडवली चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीतून वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी कासारवडवली येथून आता वाहनांचा भार गायमुख घाटात येऊ लागला आहे. या घाट रस्त्याची अवस्था वाईट असून मार्गिका अरुंद आहे. येथील वाहतुक कोंडीतून ठाणेकरांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यामुळे कासारवडवली कोंडीतून दिलासा पण घाटात कोंडी अशी स्थिती वाहन चालकांची झाली आहे.












