नागपूर: रामजन्मभूमी आंदोलनाच्या संपर्कात आलेल्यांना मोरोपंत पिंगळे यांच्याविषयी माहिती आहे. मात्र, इतर मोठ्या, शिक्षित लोकांना मोरोपंत माहिती नाहीत. विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंगल या आंदोलनात होते हेच लोकांना माहिती आहे. मात्र, रामन्मभूमी आंदोलन आणि रथयात्रेचे नियोजनही मारोपंतांनी केले होते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.
आणिबाणीनंतरच्या काळात विरोधक एकत्र आले तर सरकार येऊ शकते, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आमची त्यावेळीची परिस्थिती अमानत रक्कम जमा होण्याची होती. मात्र, मोरोपंत पिंगळे यांनी २७६ जागा येण्याचे भाकीत केले होते. निवडणुकांसाठी काम केले मात्र, निकालाच्या दिवशी ते कधीच श्रेय घ्यायला समोर येत नसत असेही डॉ. भागवत म्हणाले.












