5.2 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना निवृत्तीचे संकेत देत आहे, मोहन भागवत..”; ठाकरे गटाचा टोला

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंची आठवण सांगत पंचहात्तरीबाबत एक विधान केलं. “पंचाहत्तरीची शाल अंगावर आली की निवृत्त व्हायचं असतं” असं मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं. मोरोपंत पिंगळे यांना निवृत्त होण्यास सांगण्यात आलं तेव्हा ते निवृत्त झाले असंही मोहन भागवत म्हणाले. मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

सरसंघाचालकांच्या वक्तव्यावर संजय राऊत काय म्हणाले?

मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते. त्यावेळी काय चर्चा झाली त्याचा सारांशही मी लिहिला होता. ७५ वर्षे हे भाजपातलं निवृत्तीचं वय आहे. नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांना निवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभ्रमण करुन झालं आहे. सगळी सुखं भोगून गेलं आहे. आता जो नियम तुम्हीच केला आहे ७५ वर्षे वयाचा. मला वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करतं आहे की तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल. त्यांना देश सुरक्षित हातांमध्ये सोपवावा लागेल. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच अमित शाह यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत असतील तर देशासाठी हे शुभसंकेत आहेत असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.

मोदींना निवृत्त व्हायचं आहे हे मोहन भागवत त्यांना विसरु देणार नाहीत-राऊत

७५ वर्षे निवृत्तीचा नियम आहे तो सगळ्यांसाठी समान आहे. लालकृष्ण आडवाणी असोत, नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह.त्यांना आता निवृत्त व्हावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी वचनं देतात ती विसरतात. १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचं वचन, गरीबी हटवण्याचं वचन, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं वचन हे सगळं मोदी विसरले आहेत. मात्र तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे ही बाब देश मोदींना विसरु देणार नाही तसंच सरसंघचालक मोहन भागवतही विसरु देणार नाहीत.

मुंबई वाचवायची असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र लढलं पाहिजे ही लोकभावना-राऊत

मुंबई वाचवायची असेल, मराठी माणसाला वाचवायचं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत ही लोकभावना आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in