सोलापूर : पंढरपुरातील आषाढी वारी संपताच मंगळवारी सकाळपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. उजनी धरणासह नीरा खोऱ्यातील वीर धरणातूनही भीमा नदीच्या पात्रात २१ हजार २९० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.












