2.3 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

अभियांत्रिकी-एमबीए प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ; अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला जाहीर होणार

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश कक्षाने (सीईटी कक्ष) २८ जूनपासून सुरू केलेल्या अभियांत्रिकी आणि एमबीए अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच तात्पुरती गुणवत्ता यादी १२ जुलैऐवजी १५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सीईटी ९ ते १७ एप्रिल या कालावधीत झाली. ही परीक्षा ४ लाख २२ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी दिली. तर एमबीए अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा १ ते ३ एप्रिल या कालावधीत सहा सत्रांमध्ये घेण्यात आली. एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एमबीए सीईटीचा निकाल २८ मे आणि अभियांत्रिकी सीईटीचा निकाल १६ जून रोजी जाहीर झाला. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी सीईटी कक्षाने २८ जूनपासून अर्ज नोंदणी सुरू केली होती. अर्ज नोंदवण्याची अंतिम मुदत ८ जुलै असल्याचेही कक्षाने जाहीर केले होते. या मुदतीपर्यंत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख २७ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी १ लाख ७० हजार ६०१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली. एमबीएसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५९ हजार ५५४ इतकी आहे.र शुल्क भरून अर्ज निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ३३८ इतकी आहे.

अद्याप अनेक विद्यार्थी अर्ज निश्चितीच्या आणि नोंदणीच्या प्रक्रियेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेशासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले. अर्ज दाखल झाल्यानंतर १५ जुलै रोजी तात्पुरती यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या तात्पुरत्या यादीबाबत १६ ते १८ जुलै या काळात हरकती किंवा सूचना नोंदवता येणार आहेत. त्यानंतर २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीनुसार पुढील नियमित फेऱ्या होणार आहेत. त्याचे वेळापत्रक सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही सीईटी कक्षाने स्पष्ट केले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in