सकाळपासून पोलीसांच्या शिघ्र कृती दल कोर्लई समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आहे. सकाळी यंत्रणांनी बोटीचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे बोटीचे गुढ कायम आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी थेरोंडा येथे स्थानिकांची बैठक बोलवली असून, त्या ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.