मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा अनेक वकिलांच्या आणि न्यायमूर्तींच्या समर्पणाने, कष्टाने निर्माण झाली आहे. ती कायम ठेवा, असे आवाहनही न्यायमूर्ती गवई यांनी केली. न्यायमूर्तीपद हे कामाच्या वेळेपलीकडे जाणारी एक जबाबदारी आहे. तसेच, न्यायमूर्ती होणे हे १० ते ५ या वेळेतील काम नसून, समाजाची, देशाची सेवा करण्याची संधी असल्यावरही त्यांनी भर दिला.