प्राथमिक शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि इतर कोणालाही जमलं नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं.”












