2.3 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान आम्ही तीन शत्रूंबरोबर लढलो’, चीन, तुर्कियेचा उल्लेख करत उप-लष्करप्रमुखांचं मोठं विधान

भारताचे उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानसह चीन, तुर्कियेचाही सामना केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने निर्णायक यश मिळविल्यानंतर आता महिन्याभराने उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या पाठिशी चीन आणि तुर्कियेचा हात असल्याचे म्हटले. दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल सिंह म्हणाले, “पश्चिम भारताच्या सीमेवर भारत एका शत्रूशी लढत होता. मात्र वास्तवात भारत तीन शत्रूंना तोंड देत होता. आपल्यासमोर सीमेवर पाकिस्तान होता. मात्र चीनकडून त्यांना मदत दिली जात होती.”

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांच्या भाषणाचा व्हिडीओ पीटीआयने शेअर केला आहे. ते म्हणाले, चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात होती. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मागच्या पचा वर्षात पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांवर नजर टाकली तर त्यातील ८१ टक्के चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आहेत.

लेफ्टनंट जनरल राहुल सिंह पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. चीनसाठी भारत-पाकिस्तान संघर्ष एका प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा होता.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे रोजी भारताने जोरदार प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ला केला. १९७१ च्या युद्धानंतरचा हा सर्वात मोठा संघर्ष होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले, असे पत्रकार परिषदेत म्हटले.

राहुल सिंह यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, शस्त्रविरामाबाबत जेव्हा डीजीएमओ स्तरावर चर्चा सुरू होती. तेव्हा पाकिस्तानला भारताच्या महत्त्वाच्या व्हेक्टर्सबद्दल आधीपासूनच कल्पना होती. चीनकडून पाकिस्तानला वेळोवेळी ही माहिती पुरविली जात होती.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्य कार्यक्रमात बोलताना राहुल सिंह यांनी चीनसह तुर्कियेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, चीनप्रमाणे तुर्कियेनेही पाकिस्तानला मदत देण्यात भूमिका बजावली.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in