सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर आणि झोळंबे परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः नारळाच्या बागांमध्ये हत्तींकडून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली जात असल्याने स्थानिक बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ‘हत्ती पकड’ मोहीम राबवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.












