कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना नदीपात्रात न उतरण्याचे आणि योग्य ती सावधानता व खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातून ये-जा करणे टाळावे. तसेच, नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात सोडणाऱ्या शेतकऱ्यांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गावपातळीवरून याबाबत दवंडी देऊन जलसंपदा विभागास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.