मुंबई : इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीवरून विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या दोन शासकीय आदेशांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. विरोधकांचा दबाव तसेच आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता भाजपने हिंदीच्या मुद्द्यावर माघार घेतली. त्रिभाषेच्या संदर्भात धोरण ठरविण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्यात आल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासूनच नवीन धोरण अमलात आणले जाईल असाच एकूण रागरंग आहे.












