वीज चोरी हा गंभीर गुन्हा असून कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर कठोर कारवाई केली जात आहे. अशावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना अडवणे, धमकावणे वा हल्ला करणे सहन केले जाणार नाही. भरारी पथकाची कामगिरी सुरळीत पार पडावी यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, अन्यथा कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा अटळ आहे, असा इशारा महावितरणने दिला आहे.