5.6 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठी बातमी : दुर्घटनाग्रस्त विमानाच्या खरेदीबाबत कॅगचा होता आक्षेप, पटोलेंनी घेतले प्रफुल्ल पटेलांचे नाव

नागपूर : तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत लेखा व परीक्षण अहवालात आक्षेप घेण्यात आले होते. त्यावेळी खरेदी झालेल्या विमानांपैकी एक विमान अहमदाबादेत दुर्घटनाग्रस्त झाले. केंद्र सरकारने या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

अहमदाबाद येथे झालेल्या विमानाची खरेदी २०११-१२ मध्ये झाली. कॅगने या खरेदीत गडबड असल्याचा ठपका ठेवला होता. कॅगच्या अहवालात प्रफुल्ल पटेल यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. आता पटेल हे मोदी सरकारसोबत आहेत. विमान अपघाताची जबाबादारी सरकारने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

पटोले नागपूर पत्रकार क्लब येथे शुक्रवारी बोलत होते. काँग्रेस सरकारच्या काळात रेल्वे अपघात किंवा इतर दुर्घटना घडल्यास राजीनामा मागणारे भाजपचे नेते देशात विमान, हेलिकॉप्टर, रेल्वे, रस्ता अपघात शेकडो लोकांचे प्राण जात आहे. परंतु त्यांची जबाबदारी घेण्यास तयार नाही, असेही ते म्हणाले.

मतांची चोरी लपवण्यासाठी नियमात बदल

मतांची चोरी लपावी म्हणून सीसीटीव्ही फुटेज उमेदवारांना उपलब्ध करून देणारा निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक ९३ मध्ये बदल करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ४५ दिवसांनंतर निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले, हरियाणा राज्यातील निवडणुकीत गडबड झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज संबंधितांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे मतांची चोरी उघडकीस येईल म्हणून ही बाब निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला कळवली. उच्च न्यायालयाच्या निकालास ४८ तास होत नाही तोच केंद्र सरकारने नियम क्रमांक ९३ मध्ये बदल केला. केंद्र सरकारने निवडणूक आचारसंहितेत बदल करून निवडणुकीची काही कागदपत्रे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कॅमेरा आणि वेबकास्टींग फुटेज सार्वजनिक करण्यास मनाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील सरकार आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मतांची चोरी करायची आणि ती लपवण्याची व्यवस्था केली आहे, असेही ते म्हणाले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in