गुजरातमधील अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेमध्ये २७४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. फ्लाइट एआय-१७१ हे ७८७ ड्रीमलाइनर हे विमान अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होतं. मात्र, अहमदाबादवरून टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच हे विमान एका निवासी वसतिगृहात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. यात २७४ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या अपघातग्रस्त विमानातून सीव्हीआर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडले आहेत. त्यामधून अपघाताचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












