2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी….खरीप हंगामाची तयारी खोळंबली… पावसाअभावी बळीराजाच्या चिंतेत वाढ…

गोंदिया: रोहिणी नक्षत्र वादळ वारा आणि तुरळक प्रमाणात पाऊसा सह संपले, मृग नक्षत्रात ही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी ठप्प झाली आहे. दर वर्षी प्रमाणे पावसाच्या लवकर आगमनाच्या अपेक्षेने शेतीची मशागतीची कामे उरकलेले शेतकरी आता टक आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

जून महिना मध्यावर आला असतानाही अजून पर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे खरीप हंगामाच्या नियोजनात अडथळे येत असून वेळेवर लागवड न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

धानाचा रब्बी हंगाम संपताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे नांगरणी, तृण वेचने, शेतातील केर कचरा जाळणे या सह शेतीतील इतर आवश्यक कामे युद्ध पातळीवर पार पाडली. काही शेतकऱ्यांनी तर जुळवा जुळव करून शेतीला लागणारे बी- बियाणे ही साठवून ठेवले आहेत. पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर पेरणी करण्यासाठी सर्वत्र बळीराजा पूर्णपणे सज्ज आहे. मात्र, वरुण राजाची अवकृपा सध्या घडीला सुरू असून आकाशात  ढगांची गर्दी असूनही अद्याप एकही ठोस पावसाची सर न झाल्यामुळे शेतकरी सध्या संभ्रमात आलेला आहे. हवामान विभागाने रोहिणी नक्षत्र सुरू असताना यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे यावर विश्वास ठेवून  शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व आवश्यक असलेली मशागती ची कामे पूर्ण केली होती. मात्र सध्याच्या कोरड्या हवामानामुळे आशेवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील बळीराजा आशेवर तग धरून आहे. दररोज पहाटे पाच वाजता शेतकऱ्यांचे काम सुरू होते. अश्यातच आज पाऊस येईल या आशेने अनेक जणांनी पुन्हा पुन्हा आकाशा कडे डोळे रोखून ठेवले आहेत. ढग दाटून आले की आशा अपेक्षा वाढते, पण काही तासातच ते विरघळून ही जाते. रोहिणी नक्षत्रच्या अपेक्षा भंगानंतर आता मृगावर लक्ष केंद्रित झाले आहे. या मृग नक्षत्रात जरी मुसळधार पाऊस झाला तर उशिरा का होईना खरीप हंगाम सुरू करता येईल अशी अपेक्षा अजूनही शेतकरी मनात शिल्लक आहे. गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगाम सध्या हवामानाच्या अनिश्चितेमुळे खोळंबला आहे. निसर्गाची थोडी साथ मिळाली तर, बळीराजाची तयारी पूर्ण आहे. पण सध्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी वर्गाच्या नजरा मात्र आकाशाकडेच आहेत.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in