3.3 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

अहमदाबाद विमान दुर्घटना अपघात की घातपात? संजय राऊत यांनी व्यक्त केला सायबर हल्ल्याचा संशय

अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवारी विमानातील ब्लॅक बॉक्स आढळून आला असून त्याची तपासणी सुरू आहे. दरम्यान बोईंगच्या ड्रीमलायनर विमानांची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही ड्रीमलायनर विमानांवर संशय व्यक्त केला होता. “विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात ड्रीमलायनर विमान कोसळलं”, असा प्रश्न संजय राऊत यांनी काल उपस्थित केला होता. त्यानंतर आज त्यांनी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले, अहमदाबादमधील विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी ब्रिटन, अमेरिकेतून काही पथके आली आहेत. तर भारताच्या केंद्रीय यंत्रणाही चौकशी करत आहेत. त्यामुळे यावर आताच कोणता निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र जेव्हा बोईंग ड्रीमलायनर खरेदी संदर्भात करार करण्यात आला होता, तेव्हा भाजपाने त्यावर शंका उपस्थित केली होती. ड्रीमलायनरची क्षमता, त्याचे इंजिन याविषयी शंका उपस्थित झाल्या होत्या.

संजय राऊत पुढे म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना बोईंगची खरेदी करण्यात आली होती. आरोप झाल्यानंतर त्यांना वारंवार खुलासा करावा लागला होता.

अपघातग्रस्त विमानातील दोन्ही इंजिन एकाचवेळी कशी बंद पडली. अवघ्या ३० सेकंदात अपघात झाला कसा? हा सध्या जगभरातील उड्डाण क्षेत्राला पडलेला प्रश्न आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून सदर अपघात झाला का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तज्ज्ञ यासंबंधीचा तपास नक्कीच करतील. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर सायबर हल्ले होत आहेत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. याचा तपास होणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

अपघात की घातपात?

अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना अपघात आहे की घातपात? यासंबंधी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, याबद्दल आताच काही विधान करून मला गोंधळ वाढवायचा नाही. आमच्याकडे विविध क्षेत्रातून माहिती येत असते. त्यानुसार पुढे भूमिका मांडू. एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा ५६ टक्के कमी मनुष्यबळ आहे. विमानतळांवर विमानाची तांत्रिक देखभाल करणाऱ्यांची तंत्रज्ञांची संख्या कमी का आहे? हा प्रश्न आहे. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in