वरुण सरदेसाईंचं ते वक्तव्य अन् मंत्री देसाईंचा पारा चढला

यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासामाचा मुद्दा उपस्थित केला. तर, वरुण सरदेसाई म्हणाले, “गृहनिर्माण विभागाअंतर्गत टॉप प्रायोरिटी म्हणून या गोष्टीचा पाठपुरावा करावा. कारण गेल्या आठ वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. २०१७ पासून अनेक अधिवेशनांमध्ये माझ्या मतदारसंघातील संरक्षण दालाच्या जागेवरील विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ते काम प्रलंबित आहे. अजूनही मंत्री हे काम कधीपर्यंत होईल ते सांगत नाहीत. केवळ त्यांच्या सचिवांनी दिलेलं ब्रीफिंग (माहिती) वाचून दाखवायचं काम करत आहेत.”