मुंबई : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. पुढील काही तास या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत मुंबईतील उपनगरात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. या भागात पावसाचा जोर जास्त असेल.












