मुंबई : भारताच्या कर्करोग उपचार क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत, मुंबईतील नामवंत टाटा मेमोरियल सेंटरने देशात प्रथमच उच्च मात्रेतील एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ही थेरपी न्यूरोब्लास्टोमासारख्या दुर्मिळ आणि गंभीर प्रकारच्या बालकर्करोगावर प्रभावी उपाय म्हणून पुढे आला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.












