1.5 C
New York
Wednesday, December 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

…म्हणून न्यायमूर्तीपदी नियुक्ती होताच नागपूर खंडपीठात कार्यरत झालो,सरन्यायाधीशांकडून त्यामागील कारणाचा खुलासा

मुंबई : अठरा वर्षांच्या वकिलीनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर लगेचच आपल्याला नागपूर खंडपीठात पाठवण्यात आले. त्याआधी कोणीच न्यायमूर्ती त्यांच्या काही कारणांमुळे नागपूर खंडपीठामध्ये काम करण्यास तयार नव्हते. तथापि, मोठ्या अंतरानंतर आपल्याला तेथे जाण्यास सांगण्यात आले आणि आपण तेथे रूजू झालो, असा खुलासा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी उच्च न्यायालयातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी केला.

नागपूर खंडपीठात कार्यरत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण एका अपिलावर निर्णय दिला. तेथे काही काळ काम केल्यानंतर आपल्याला आधी औरंगाबाद, मग मुंबई, पुन्हा नागपूर, परत औरंगाबाद आणि मध्येच गोवा खंडपीठात पाठवण्यात आले.

मुंबईत आल्यानंतर वडील आजारी असल्याच्या वैयक्तिक कारणास्तव आपण तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे आपल्याला नागपूर खंडपीठात काम करू देण्याची विनंती केली. ती मान्य केली गेली. काही काळ नागपूरमध्ये काम केल्यानंतर मुंबई खंडपीठात कार्यरत होण्यास सांगितले गेले. नंतर मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली आणि आता सरन्यायाधीशपदी आपण कार्यरत आहोत, असे सांगून गवई यांनी न्यायमूर्तीपदाचा प्रवास यावेळी विशद केला.

मुंबईत पहिल्यांदा खंडपीठात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा आपल्याला सोपवलेली जबाबदारी खूपच नवीन होती. प्राप्तिकराशी संबंधित प्रकरणे आपल्यापुढे सूचीबद्ध होती. यापूर्वी ही प्रकरणे आपण कधीच हाताळली नव्हती आणि समोर या विषयांतील दिग्गज वकील युक्तिवादासाठी उभे राहायचे.

त्यामुळे, आपल्यासाठी ही प्रकरणे नवीन असल्याची प्रांजळ कबुली देऊन काही दिवस आपल्याला न्यायमूर्ती म्हणून नाही, तर विद्यार्थी म्हणून वागणूक देण्याची विनंती आपण या वकिलांना केल्याचे गवई यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर, मात्र आपण ही प्रकरणेही सहजपणे हाताळू लागलो. पुढेही हाच कित्ता कामकाजाबाबतच्या नव्याने येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत आपण गिरवल्याचे सरन्यायाधीशांनी प्रामुख्याने नमूद केले.
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in