पंढरपूर : माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले. तर, दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण रंगले. पालखी सोहला आता पंढरीच्या समीप येऊन पोहोचला असून शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. पंढरी नगरी वैष्णवांच्या मांदियाळीत अर्थात भाविकांच्या भक्तिसागरात न्हाऊन निघणार आहे.












