2.4 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

जेव्हा मरण समोर दिसतं! जीव वाचवण्यासाठी पठ्ठ्या थेट बिबट्याशी भिडला; VIDEO चा शेवट पाहून अंगावर येईल काटा

लखीमपूर खेरी भागात मानव व वन्यजीवांमधील संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, बिबट्या व माणसांमधील संघर्षाचं चित्रण करणारा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. धौरहरा फॉरेस्ट रेंजमधील बबुरी येथील एका वीट भट्टीत बिबट्या शिरला आणि त्याने तिथल्या एका कामगारावर हल्ला केला. मात्र, ज्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला त्याने न घाबरता बिबट्याचा सामना केला. या तरुणाने एकट्याने या बिबट्याशी झुंज दिली आणि स्वतःचा बचाव केला. बिबट्याच्या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे. मात्र, स्वतःचा जीव वाचवण्यात तो यशस्वी ठरला.

या घटनेचा व्हिडीओ पाहून लोक तरुणाच्या हिमतीचं कौतुक करत आहेत. कारण कोणत्याही शस्त्राशिवाय त्याने बिबट्याशी दोन हात केले. दुसऱ्या बाजूला मानव व वन्यजीवांमधील संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच लखीमपूर व आसपासच्या भागातील जगंलतोडीच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली आहे.

तरुणाची बिबट्याशी झुंज

तरुण आणि बिबट्याची झुंज पाहून वीट भट्टीत काम करणारे इतर मजूर व आसपासचे लोक तिथे जमा झाले. सर्वजण केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. कोणीही पुढे जाऊन त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. काही तरुण दूर उभे राहून बिबट्याला दगड मारत होते. तर काहीजण वीटांचा मारा करून बिबट्याला तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्याचा बिबट्यावर फारसा परिणाम झाला नाही. तरुणाने बराच वेळ झुंज दिल्यानंतर बिबट्या तिथून निघून गेला. मात्र, तोवर हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर वीट भट्टीतील इतर मजुरांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं.

उत्तर प्रदेशात बिबट्यांचे वाढते हल्ले

अलीकडेच उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील मोहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. हिमांशू, राममिलन, नावेद व पप्पू अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या चार जणांची नावं असून हे चारही जण अद्याप रुग्णालयात आहेत.

अखिलेश यादव यांची टीका

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत अखिलेश यादव यांनी तरुणावर चांगले उपचार करण्याची मागणी केली आहे. भाजपा सरकारच्या काळात वनं लुटली जात आहेत. जंगलांमध्ये अतिक्रमणं होत आहेत. परिणामी प्राण्यांसाठी जंगलंच राहिली नाहीत. त्यामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये जाऊन हल्ले करत आहेत.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in